Lockdown
चला चला आवरा पटपट. कॅब बोलावली आहे ना एरपोर्टवर जायला. मी पटकन बॅग उचलली आणि ..... इतक्यात मला जाग आली. जाणवल कि हे स्वप्न होत. Covid-१९ च्या lockdown च्या काळात पडलेलं स्वप्न. आता प्रवास म्हणजे स्वप्नात बघायची वेळ एखादे वर्षासाठी तरी आपल्यावर आली आहे. ज्यावेळी मी सुरवातीला चायना मधील लोकांचे मास्क घातलेले फोटो, बातम्या पाहायचे तेव्हा वाटायचं हा रोग काही आपल्यापर्यंत येणार नाही. पण जेव्हा आम्ही राहतो तिथला पुढचा चौक सील केला तेव्हा त्या दिवसाची पुन्हा आठवण झाली. T.V.वार त्याच त्याच बातम्या अखंड पानोपानी व्यापलेल वर्तमानपत्र हे सगळं उदास करणार आहे खर. चार पाच केसेस ऐकता ऐकता आता लाखाचा आकडा पार झाला. Lockdownच्या सुरवातीला Janata curfew पुकारला गेला तेव्हा वाटलं नव्हतं कि आता इथून पुढे ६० दिवस आपण असेच घरात बसून राहणार आहोत. खिडकीतून बाहेर बघण्याएवढाच काय तो आपला बाहेरच्या वातावरणाशी संबंध येणार आहे. आधी गाड्या बंद ,मग कंपन्या बंद, मग संचारबंदी अस एक एक करून Lockdown ने आपले हात पाय पसरायला सुरुवात केली. एक दिवस बातमी आली covid-१९ भारतात आला, पुण्यात आला आणि भीतीने कोरड पड